कृषि उत्पन्न बाजार समिती, काटोल जि. नागपुर
काटोल कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना त्या वेळच्या मध्यप्रान्त व वऱ्हाड राज्य शासनाच्या अधिसुचना क्र. 1242-1068-10 दिनांक- 29 जुलै 1940 अन्वये झाली असुन त्या वेळी फक्त कापुस हया शेतमालाचे खरेदि विक्रीचे नियमन या बाजार समिती मार्फत होत असे.
त्या नंतर मा. आयुक्त नागपुर विभाग नागपुर यांची अधिसुचना क्र. सी.ओ.पी.- 56 काटोल दिनांक- 08 जुलै 1960 अन्वये या बाजार समितीला कापुस बाजार समिती ऐवजी कृषि उत्पन्न बाजार समिती असे संबोधन्यात येवु लागले आणि बाजार समितीचे क्षेत्र बाजार आवाराचे 4 मैल परीसरा पुरते मर्यादित करण्यात आले. त्या नंतर सदर्हु बाजार समितीचे कार्यक्षेत्रात काटोल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रापुरते वाढविण्यात येवुन या क्षेत्रात खालील कृषि मालाचे खरेदि विक्रीचे नियंत्रन करण्यात आले. जसे कापुस, ज्वारी, गव्हु, तुर, चना, उडीद, मुंग, व इतर धांन्य तसेच गुरे-ढोरे, शेळया-मेंढया व संत्री मोसंबी .
सर्व माहितीसाठी....
